“विचार न करता वाचन म्हणजे न पचवता खात सुटण.”
“दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.”
“खोटेपणा करणारा चोरांपेक्षाही वाईट असतो.”
“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”
“खरा मनुष्य कोणाचाच व्देष करत नाही.”
“संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.”
“निसर्गाचे नेहमीच अनुकरण करा, संयम हे त्याचे रहस्य होय.”
“शहाण्याला शब्दांचा मार.”
“तोंड बंद ठेवलं तर, तर मासाही अडचणीत येत नाही.”
“करू ना ! काय घाई आहे, म्हटलं कि ती गोष्ट होतचं नाही. आजचा दिवसच योग्य.”
“रिकामे डोके शैतानाचे घर असते.”
“संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.”
“ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड.”
“मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर येतेच.”
“चकाकते ते सर्व सोन नसते.”
“कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.”
“जुना मित्र हा नव्या वास्तू सारखा असतो.”
“खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.”
“संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.”
“कला म्हणजे एखादी वस्तू नाही, तो एक मार्ग आहे.”
“वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच आहे.”
“लहान मुले म्हणजे देवा घरची फुलच.जसे जीवन असते तसा त्याचा अंत असतो.”
“बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.”
“सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे सौंदर्य.”
“विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते.”
“आयुष्य सहज सोप जगायला शिका, तरच ते सुंदर होईल.”
“अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.”
“मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.”
“चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.”
“जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.”
“मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय.”
“गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.”
“विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.”
“यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.”
“जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.”
“अंधश्रद्धे पेक्षा मौन कधीही चांगले.”
“एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले.”
“चरित्र हाच खरा इतिहास असतो.”
“नास्तीकपणा हा फक्त माणसाच्या ओठावर असतो, तो त्याच्या मनात नसतो.”
“ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते तो भाग्यवान होय.”
“चिंता पाहुणा म्हणून येते आणि लवकरच मालक बनून राहते.”
“चारित्र्य म्हणजे नियती.”
“चारित्र्य स्वच्छ तसेच चमकणारे असावे.”
“दिलेले दान केव्हाच निरर्थक ठरत नाही.”
“विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही.”
“आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण सुखी असतोच असे नाही.”
“श्रद्धा ही जीवनाची शक्ती असते.”
“मैत्री म्हणजे समानता.”
“मैत्री जत्रेत विकत घेता येत नाही.”
“परमेश्वर एकच आहे, पण रूप अनेक आहेत.”
“भाग्य नेहमी धैर्यवानालाच अनुकूल असते.”
“सर्वांचे ऐकून घ्या, पण फार थोड्यांजवळ स्वतः चे मन मोकळे करा.”
“कीर्ती ही सावलीप्रमाणे सद्गुणांबरोबर जात असते.”
“थोर कार्य ही थोर मनाची प्रतीके असतात.”
“मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात.”
“महान माणसांची माने साधी असतात.”
“जो एकांतात राहू शकतो तो खरोखरच महान असतो.”
“मरण सोपे असते, जगण्यासाठी मात्र धैर्य लागते.”
“सर्व साधारण व्यक्ती सुप्त मेंदूचा केवळ 10 टक्केच वापर करतो.”
“जो नेहमी हसतो तो नेहमी विजय होतो.”
“जो परोपकारी स्वभावाचा तो खरोखर थोर होय.”
“स्वतः वर नियंत्रण ठेवणारा चांगले राज्य करू शकतो.”
“आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात.”
“इतिहास म्हणजे उदाहरणांवरून शिकलेले तत्वज्ञान होय.”
“इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो आणि सत्याचा प्रकाश असतो.”
“जो वेळ काढतो त्याला सर्व काही मिळते.”
“स्वर्ग आणि नरक पृथ्वीवरच आहे.”
“जीवन म्हणजे आत्म्याचे सामर्थ्य ओळखण्याचे साधन.”
“वाईट बातमीला पंख असतात तर शुभ बातमीला पायच नसतात.”
“कल्पना आपल्या स्वप्नांवर राज्य करतात.”
“सर्व गोष्टींच्या बाबतीत नेहमीच निराशेपेक्षा आशा बाळगणे चांगलेच असते.”
“वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच खर्च होते.”
“पैसे मागे ठेवून मरण्यापेक्षा जीवन श्रीमंतीत घालवावे.”
“द्वेष करणे सोपे असते,पण प्रेम करणे आरोग्यदायक असते.”
“माणसाला शत्रू नसणे ही अशक्यप्रायः गोष्ट आहे.”
“मरणापेक्षा जीवन जगण्याला जास्त धैर्य लागते.”
“ज्ञान उड्या मारत नाही पायरी पायरी ने पुढे जाते.”
“ज्ञान दुसऱ्याला देता येते, पण शहाणपण देता येत नाही.”
“श्रम हेच जीवन.”
“संपत्तीचा अभाव हे सर्व वाईट गोष्टीचे मूळ आहे.”
“जीवन हे फुल आहे आणि प्रेम हा त्या फुलातील मध आहे.”
“जीवन म्हणजे पराकोटी चा आनंद होय.”
“सर्वांनी एकत्र श्रम केल्याने कठीण काम हलके होते.”
“माणूस परिस्थितीचा गुलाम असतो.”
“दुसऱ्याला शिकवीत असतांना माणूस स्वतःला शिकवीत असतो.”
“द्या हा खरोखरच दैवी गुण आहे.”
“संयम हेच खरे औषध.”
“पैशाने माणसाला महत्व प्राप्त होते.”
“संगीत म्हणजे परमेश्वराने दिलेली वैभवशाली व सुंदर देणगी आहे.”
“जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो.”
“निसर्ग हाच खरा कायदा.”
“दुसऱ्याच्या दुर्दैवात आनंद माणू नका.”
“जेथे मान निर्मळ असते, तेथे थोड्या शब्दांनी काम होते.”
“पैसा नसेल तर माणसाची किंमत नसते.”
“काट्याच्या भीती शिवाय तुम्ही गुलाब तोडू शकत नाही.”
“जेथे स्वातंत्र्याचा वास असेल तोच माझा देश.”
“जे संपले आणि ज्याला इलाज नाही त्याबद्दल दुखः ही करू नये.”
“रागाच्या भारत माणूस जसे वागतो ते शेवटी लाजिरवाणे ठरते.”
“सद्गुणाचे बक्षीस सद्गुण असते.”
“आपण श्रद्धेवर जगत असतो.”
“भरभराटीच्या दिवसांमुळे आपण बिघडून जातो.”
“लपवाछपवीने दुर्गुणांना खतपाणी मिळते.”
“मैत्री असली म्हणजे सर्व ओझी असतात.”
“श्रम संपले म्हणजे आनंद होतो.”
“आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्या.”
“कोणत्याही खोल जखमेचा व्रण मागे राहतोच.”
“माणसाचा खरा शत्रू कोण असतो तर तो स्वतःच असतो.”
“जो एक दिवस देतो तो दुसरा दिवस घेउन जातो”
“स्तुतीपुढे कोणतीही स्त्री टिकाव धरू शकत नाही”
“जेथे चिंता राहील तेथे झोप राहू शकत नाही.”
“चुका करणे हा माणसाचा, परंतु क्षमा करणे हा ईश्वराचा गुणधर्म आहे.”
“सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे.”
“श्रम करणे म्हणजेच प्रार्थना करणे होय.”
“माता आणि पिता यांच्यावर प्रेम करणे हा निसर्गाचा पहिला नियम आहे.”
“घाबरटाला सारेच अशक्य असते.”
“सत्य हे अमर आहे, तर चूक ही मर्त्य आहे.”
“एका रात्रीत तयार झालेल्या बर्फावर विश्वास ठेवू नका.”
“स्वाभिमान हा सर्वच सद्गुणांचा पायाच म्हणता येईल.”
“मौन ठेवले तर चांगलेच होते, वाईट होत नाही.”
“खरे शहाणपणाचे उत्तर म्हणजे मौन होय.”
“विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप.”
“जीवनातील यश हे खूप कष्टाने मिळते.”
“माणूस पाहून तुमचे वर्तन ठेवा.”
“दुःखातून येणारे सुख हे मधुर असते.”
“संशयातून संशयच उत्पन्न होतो.”
“जो बदलत नाही तो असमंजस असतो.”
“प्रेम काढून टाकल्यास आपले जग थडग्यावत होईल.”
“कामात मग्न असणाऱ्यांना अश्रू ढाळायला वेळ मिळत नाही.”
“सहनुभूती ही जीवनातील सुंदर गोष्ट आहे.”
“इच्छापूर्ती झाली म्हणजे ती आत्म्याला मधुर वाटते.”
“फसविण्यात अत्यंत सोपी व्यक्ती म्हणजे आपण स्वतः च होय.”
“या जगात सर्वात सोपी आणि निरुपयोगी गोष्ट म्हणजे चिंता करणे.”
“श्रमातून जे फळ मिळते ते सर्व प्रकारच्या सुखात अत्यंत मधुर असते.”
“वर्तमानकाळ हा भविष्यकाळ विकत घेत असतो.”
“माणूस जितका मूर्ख, तितका तो खोटा बोलणारा असतो.”
“सत्याचा खरा मित्र म्हणजे काळ.”
“अशक्य गोष्ट ती कि जिच्यासाठी प्रयत्न केलेले नसतात.”
“उपाशी पोटी साधे अन्न देखील रुचकर लागते.”
“जो निष्पाप असतो, त्याला सुखाची झोप लागते.”
“दिवस कितीही मोठा असला तरीही त्याचा अंत होतोच.”
“तलवारीपेक्षा लेखणीचे सामर्थ्य अधिक असते.”
“श्रम करणाऱ्याला गोड झोप लागते.थोड्या आनंदात गोडी असते.”
“द्वेष करणाऱ्या माणसाची नजर फार तीक्ष्ण असते.”
“दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.”
“आपण जिंकू असा विश्वास असलेलेच विजयी होऊ शकतात.”
“साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.”
“उपकार घेणे म्हणजे स्वतःचे स्वातंत्र्य गमावणे होय.”
“मोठी व्यक्ती संधी मिळाली नाही अशी तक्रार कधीच करीत नाही.”
“नव्या पुस्तकाइतके जुने काहीच नाही.”
“एक चागंली माता शंभर शिक्षकांच्या मोलाची असते.”
“संयम नावाच्या कटू वृक्षाचे फळे नेहमी गोड असतात.”
“जबाबदारी पडली कि ती शिकवतेच.”
“धडपडी नंतर विश्रांती सुखकर असते.”
“श्रीमंत व्यक्तींना पुष्कळ मित्र असतात.”
“उधळेपणा दुर्बल स्वभावाचा दुर्गुण आहे.तत्परता हा व्यवसायाचा आत्मा आहे.”
“पश्चाताप हा दुर्बल माणसांचा सद्गुण होय.”
No comments:
Post a Comment